मुंबई – देशभरात सुरू असलेल्या करोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आघाडी कायम राखली आहे. राज्यात नऊ कोटींहून अधिक नागरिकांचा करोना लसीचा किमान एक डोस पूर्ण झाला आहे. हे प्रमाण कोणत्याही राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे. राज्यात बुधवारी संध्याकाळपर्यंत नऊ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले असून यापैकी 2.76 कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
राज्यात ठाणे जिल्ह्याने आघाडी घेतली असून आतापर्यंत करोना लसीचे 75 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. बुधवारपर्यंत ठाण्यात कोविड -19 लसींचे 75,32,755 डोस देण्यात आले होते. दरम्यान, राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी “कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. 8 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.