मुंबई – महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने आगमन केलं आहे. मुंबईसह ठाणे जिल्हा, पालघर, नवी मुंबई, रायगडसह संपूर्ण कोकणात पाऊस चांगलाच कोसळतोय. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहणं अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसांसाठी महाराष्ट्रासाठी खाई जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra | ‘Orange’ alert for heavy to very heavy rainfall issued in Raigad, Ratnagiri, Sindhudrug, Pune, Kolhapur and Satara districts till 27th July; Mumbai also likely to receive heavy to very heavy rainfall tomorrow: Regional Meteorological Centre, Mumbai pic.twitter.com/8TZZc8bEBg
— ANI (@ANI) July 24, 2023
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना 27 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या जिल्ह्यांमध्ये गुरूवारपर्यंत (दि.27 जुलै) अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, उद्या (दि.25 जुलै) मुंबईतही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं सांगितले आहे.
तसेच 24 जुलैपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने 25 ते 27 जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी देखील घरातच राहून आपली काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.