नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणीदरम्यान निकालासंदर्भात टिप्पणी केली. या खटल्याची सुनावणी करणाऱ्या घटनापीठाचे एक न्यायाधीश 15 तारखेला निवृत्त होत असल्यामुळे याच आठवड्यात निकाल लागेल, असे बोलले जात होते. या निकालावरच महाराष्ट्राचं पुढचं राजकीय भवितव्य ठरणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत आणि गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस पाठवली. या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी बाजू मांडली. या आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे न्यायालयानेच त्यांना अपात्र करावे, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला.
दुसरीकडे शिंदे गटाने मात्र हा दावा फेटाळून लावला. आम्ही पक्षविरोधी कारवाई केली नाही, तर आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला. या 16 आमदारांवर आम्ही कारवाई कशी करणार? या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधिमंडळाच्या अंतर्गत येतो, असं मत यावर सुनावणी करताना न्यायालयाने मांडले. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे यायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जाणून घ्या, लाइव्ह अपडेट्स…
राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण माझी लढाई जनतेसाठी
– उद्धव ठाकरे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालच्या वाचनाला सुरुवात
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून वाचन सुरु
सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीचं थेट प्रक्षेपण…
-सर्वोच्च न्यायालयाचे शिंदे गटाला धक्का देणारे निरीक्षण
-मीचं खरी शिवसेना असा दावा कोणी करु शकत नाही
-बहुमत चाचणीसाठी पुरेशी कारणं नसल्याने बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती – सर्वोच्च न्यायालय
– सुप्रीम कोर्टानं फडणवीसांना फटकारलं
– शिंदे सरकार बचावला
– शिंदे फडणवीस सरकार वाचलं
-१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षाकडेच
-उद्धव ठाकरेंच्या बाजूने काय ?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्य मुद्दे
-अध्यक्षांच्या अधिकारच प्रकरण 7 न्यायमूर्तींकडे
-भरत गोंगावले यांची प्रतोद पदाची नियुक्ति बेकायदेशीर
-कोणताही गट पक्षावर दावा करु शकत नाही
-बहुमत चाचणी बोलवण्याची गरज नव्हती
-राज्यपालांना राजकारणाचा भाग घेता येत नाही
-16 आमदारांचा निर्णय अध्यक्ष घेणार
पुणे : घटनातज्ञ उल्हास बापट live
‘राज्यपालांचे सर्व निर्णय बेकायदेशीर ठरले, तर कायदेशीर काय आहे? शिंदे-फडणवीसांनी उगाच पेढे वाटू नये’ – संजय राऊत
पहा एका क्लिकवर
सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला मोठा झटका
‘१४५ आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे,तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता
येणार नाही’
– अजित पवार
सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाचा फैसला… जनतेच्या न्यायालयाचा अर्थात तुमचा कौल कोणाला?
132
या देशात लोकशाही आहे कि नाही हे आजच्या निकालावर स्पष्ट होईल : संजय राऊत
दिल्ली सरकारच्या निकाल वाचनाला सुरुवात; काही मिनिटांतच महाराष्ट्राचा निर्णय
विजय आमचाच असणार, राधाकृष्ण विखे-पाटलांचा विश्वास
खुर्चीसाठी आमदारांची धावपळ, सत्ता संघर्षाच्या निकालाशी सामान्य जनतेला देण घेणं नाही : संभाजीराजे
निकालानंतर शिंदे आणि फडणवीस पत्रकार परिषद घेणार
आपली भूमिका संपली – राज्यपाल
न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार ? सत्तासंघर्षातील ‘या’ आहेत सहा महत्वाच्या याचिका
Maharashtra Poltical Crisis Live Update: – निकालाआधी अब्दुल सत्तार यांना कॉन्फिडन्स,’विजय आमचाच’
‘आमची बाजू सत्याची आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. विजय आमचाच असेल.’
निकाल आमच्याच बाजूने लागेल – संजय शिरसाट
नरहरी झिरवळ रिचेबल म्हणाले,’निकाल आमच्याच बाजूने’
“…यावरून निर्णय सरकार विरोधात येण्याची दाट शक्यता ?” अंजली दमानिया यांचे ट्विट चर्चेत
शरद पवारांनी समजावून सांगितल्यामुळे नरहरी झिरवळ नॉट रिचेबल झाले असतील – उदय सामंत
“सोळा आमदार अपात्र ठरले तर उर्वरित 24 देखील अपात्र होणार आणि..” न्यायालयाच्या निकालपूर्वी संजय राऊत यांचं मोठं विधान
‘नरहरी झिरवळ नॉट रीचेबल’ संजय राऊतांच खोचक ट्विट,’आज वाट पाहतोय तुमची’
सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का; जयंत पाटील यांना ईडीची नोटीस
शिंदे यांचा बोलण्यास नकार
या पार्श्वभूमीवर राज्यात हालचालींना वेग आला असून यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. ते जळगाव दौऱ्यावर आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. आज सत्ता संघर्षाच्या सुनावणीबाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणे टाळले. सर्वांना शुभेच्छा म्हणत मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला.
काय म्हणाले सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी आज सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावण्यांसदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, आज दोन घटनापीठातील महत्त्वाच्या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. समलिंगी विवाहाप्रकरणी सुरू असलेली सुनावणी आज दुपारी 12 वाजता करण्यात यावी. कारण, आज सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या लिस्टिंग आहेत, असे सरन्यायाधीश यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांना सांगितले. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मार्च महिन्यात पूर्ण झाली आहे.
मी जेव्हा 16 आमदारांना अपात्र केलं ते काही कुठल्याही आकसापोटी किंवा कुठल्याही अन्य कारणापोटी केलं नव्हतं. जे काही कायद्याच्या चौकटीत होतं त्या नियमानुसार मी त्यांना अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की न्यायदेवता मी दिलेला निर्णय मान्य करेल.
– नरहरी झिरवळ, विधीमंडळाचे उपाध्यक्ष
आमची केस मजबूत आहेत. यामुळे योग्य निकाल येईल, अशी आमची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. निकाल येईपर्यंत कोणतेही तर्कवितर्क काढणे योग्य नाही. राज्याचे सरकार हे एकदम
स्थिर आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रात किंवा देशात कोणतंही सरकार हे बहुमतांच्या आधारावर सत्तेत असतं. मी विधानसभा अध्यक्ष झाल्यावर शिंदे-फडणवीस यांनी बहुमत सिद्ध केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कोणताही निर्णय आला तरी सरकार स्थिर राहणार आहे. सरकारला कोणताही धोका नाही.
– राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष
या आहेत सहा याचिका
पहिली : ठाकरे गटाचे आमदार सुभाष देसाई यांची याचिका आहे. या याचिकेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
दुसरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. या याचिकेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना प्रतिवादी केले आहे.
तिसरी : शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. यातही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना प्रतिवादी केले आहे.
चौथी : ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. या याचिकेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
पाचवी : आमदार सुनील प्रभू यांची आहे. या याचिकेत विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व अन्य यांना प्रतिवादी केले आहे.सहावी : आमदार सुनील प्रभू यांचीच आहे. या याचिकेत विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना प्रतिवादी केले आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्षांवरअविश्वास प्रस्ताव
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याप्रमाणेच महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांच्यावरही अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पेच निर्माण होणार का? अध्यक्ष-उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव असेल तर मग अपात्रतेच्या सुनावणीसाठी प्रोटेम स्पीकरची निवड करण्यात येणार का? असा प्रश्नही काही घटनातज्ज्ञ विचारत आहेत.