मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आज आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले. यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्ययालयाने आज जो निकाल दिला आहे त्यामध्ये सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघड नागडं राजकारणाची चिरफाड केली आहे. सगळ्यात महत्वाचे राज्यपालांची भूमिका अयोग्य होती हे देखील आता स्पष्ट झालं आहे. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झालं आहे.राज्यपाल ही यंत्रणा ठेवावी कि नाही हा विचार सुद्धा न्यायालयासमोर यायला पाहिजे असं ठाकरे म्हणाले. अध्यक्षांनी वेळ न घालवता लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही करणारच आहोत असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मी ज्याप्रमाणे राजीनामा दिला त्याप्रमाणेच आता मुख्यमंत्री शिंदेनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आता एकनाथ शिंदे यावर काय भाष्य करतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
काय घडलं निकालादरम्यान
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले.
कोर्टाने नोंदवली महत्वाची निरीक्षणे
भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती..
ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असत
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे..
सुनील प्रभू योग्य प्रतोद कोर्टाचा निर्णय
खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा