मुंबई – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत पावसाने थैमान घातले आहे. यामुळे रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यात नद्यांना पूर आला. तर काही ठिकाणी दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून नागरिकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एनडीआरएफसह राज्यतील यंत्रणांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
राज्यातील मृतांची एकूण संख्याही वाढून 164 इतकी झाली आहे. वर्धा आणि अकोल्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 100 जण बेपत्ता असल्याचे सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, रायगड – 71, रत्नागिरी – 21, सातारा – 41, ठाणे – 12, कोल्हापूर – 7, मुंबई – 4, आणि सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा आणि अकोल्यात प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 56 जण जखमी झाले असून अद्याप 100 जण बेपत्ता आहेत. अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे.