– हिमांशू
सकाळची पहिली जांभई दिली. नेहमीच्या शिरस्त्यानुसार डोळे उघडण्यापूर्वी हाताने उशीच्या आसपास चाचपून पाहिलं. रात्री हातातून गळून पडलेला मोबाइल जवळच सापडला. तो ऑन करून ‘थम्ब’ देईपर्यंतच्या सर्व क्रिया डोळे मिटूनच केल्या. अंगठ्याला व्हायब्रेशन जाणवल्यावर डोळे किलकिले करून व्हॉट्सअॅप ओपन केलं. अर्धवट उघडलेले डोळे अचानक पूर्ण उघडले. जाग येणं म्हणजे झोप जाणं, एवढंच आजवर माहीत होतं. पण ‘झोप उडणं’ काय असतं, हे आज पहिल्यांदाच डोळेभरून अनुभवलं. ‘तो’ मजकूर पडल्या-पडल्या वाचण्याजोगा नव्हता म्हणून उठून बसलो. डोळे चोळून मोठ्ठे केले आणि भराभरा वाचायला सुरुवात केली.
असं कसं शक्य आहे? परवाच ग्रुपमधल्या एकाचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आली होती. दिवसभर त्या मित्राच्या आठवणी आणि ‘आरआयपी’ एवढंच ग्रुपवर चाललं होतं. पण काल सकाळपासून नेहमीचे हास्यविनोद आणि ग्रुपच्या सदस्यांचं ‘सेल्ङ्ग प्रमोशन’ रेग्युलर सुरू झालं होतं. एक-दोघांनी तर स्वरचित कवितासुद्धा टाकल्या होत्या. राजकीय परिस्थितीवरून भांडणंही छान रंगली होती. ही ‘सुविधा’ अचानक बंद करण्याचं कारणच काय? बातमीत ‘शक्यता’ हा शब्द असला तरी धास्ती वाटणारच ना?
व्हॉट्सअॅप बंद होण्याच्या शक्यतेची बातमी व्हॉट्सअॅपवरच वाचावी लागण्यामागं केवढी मोठी वेदना असू शकते, हे अँड्रॉइड ङ्गोन नसणार्यांना, अँड्रॉइड असूनसुद्धा ही सुविधा न घेणार्यांना आणि सुविधा असूनही तिचं कौतुक नसणार्यांना कशी समजणार? आम्ही सोशल मीडियामध्ये विशेषतः व्हॉट्सअॅपमध्ये पूर्णपणे गुरङ्गटून गेलो आहोत, म्हणून दूषणं देणार्यांना या सुविधेचं मोल कळलंच नाही. आमच्या जाणिवा बोथट झाल्यात, असा आरोप करणार्यांच्या संवेदना, व्हॉट्सअॅप बंद होण्याची शक्यता, ही बातमी वाचताना कुठे गेल्या होत्या? चारचौघे कुठेही जमलो, की ही मंडळी सतत बडबडत राहतात. त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष झालं की गुरगुरतात.
म्हणतात, ‘‘हाडामांसाची माणसं समोर बसलेली असताना मोबाइलमध्ये माना खुपसून कसले बसता हो?’’ आम्हीही त्यांना बेधडक उत्तर देतो, ‘‘आमच्याशी चॅट करणारी माणसंसुद्धा हाडामांसाचीच आहेत.’’ अशा आमच्या चॅटकर्त्यांचं ‘एन्ड टू एन्ड एन्स्क्रिप्शन’ धोक्यात येत असेल, तर कंपनी आमचीच बाजू घेणार ना? अशा कितीतरी कंपन्या आहेत, ज्यांच्या केसेस चालल्यात;
पण त्यांनी ग्राहकांना त्याची झळ बिलकूल बसू दिलेली नाही. मग सेवा बंद करण्याचा इशारा देण्याची वेळ आमच्या लाडक्या अॅपवरच का बरं यावी? बातमीत म्हटलंय, आम्ही एकमेकांना पाठवलेले मेसेज कंपनीनं साठवून ठेवायचे, असा काहीतरी नियम सरकारनं काढलाय. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लाखो मेसेज सांभाळून ठेवायचे म्हटल्यावर खूप मोठी यंत्रणा उभी करावी लागेल.
क्षणभर कल्पना करा… व्हॉट्सअॅप यापुढे दिसणारच नाही… आपला कुणाशी संवादच होणार नाही. काय होईल आपलं? अहो, काही तासांसाठी सर्वर डाऊन झाला तरी कित्येकांचं ब्लडप्रेशर वाढतं. दोष नेट कनेक्शनमध्ये आहे की अॅपमध्ये, हे शोधायला सुरुवात होते. एकमेकांना कधीच ङ्गोन न करणारे ङ्गोनवरून चौकशा करू लागतात. चाळीस कोटी यूजर्सचा मामला आहे हो. म्हणणारे म्हणतील, ‘सोशल मीडिया नव्हता तेव्हाही जग चालत होतंच ना?’अशांना रेल्वे आणि टेलिङ्गोन नव्हता, त्या काळात नेऊन सोडलं पाहिजे..!