नवी दिल्ली : आज (दि. १४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेले नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.
“करोनापासून होणारे नुकसान खूपच कमी ठेवण्यात भारताला यश मिळाले आहे. शिस्तबद्ध रितीने भारतीयांनी कर्तव्याचे पालन केले आहे. अनेकांना खूप त्रास भोगावा लागला. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण कर्तव्य निभावत आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हीच आदरांजली की प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात. अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात नववर्षाचे स्वागत देशभऱात झाले, परंतु लोकांनी नियमांचे संयमाने पालन केले. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे,” असे यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितले.
India to remain in lockdown till May 3, announces PM Modi
Read @ANI Story | https://t.co/TpyrKLv1l5 pic.twitter.com/GDAPI3eZxU
— ANI Digital (@ani_digital) April 14, 2020
“जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने करोनाला रोखण्याचा कसा प्रयत्न केला याचे आपण साक्षीदार आहात. करोनाचे बाधित १०० होण्याच्या आधीच भारतानं विदेशी नागरिकांसाठी १४ दिवसांचे विलगीकरण केले. करोनाचे फक्त ५५० बाधित भारतात होते तेव्हाच भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढण्याची वाट न बघता जेव्हा समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन ती समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला. हे असं संकट आहे की तुलना योग्य नाही, पण वास्तव हे आहे की जगातल्या बड्या देशांचे आकडे बघितले तर लक्षात येतं की भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.
Till 20th April, all districts, localities, states will be closely monitored, as to how strictly they are implementing norms. States which will not let hotspots increase, they could be allowed to let some important activities resume, but with certain conditions: PM Modi pic.twitter.com/tL2YOBxe7u
— ANI (@ANI) April 14, 2020
“महिन्यापूर्वी जे देश भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा २५-३० टक्के जास्त बाधित झालेत, हजारो लोकं प्राणास मुकलीत. भारतानं योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही. परंतु या अनुभवातून हे स्पष्ट झालंय की आपण जो रस्ता निवडला तोच बरोबर आहे.
सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाउनचा खूप फायदा झालाय. फक्त आर्थिक बाजू बघितलं तर खूप महाग पडल्याचं दिसू शकतं, खूप किंमत चुकवायला लागली, परंतु जिवितापेक्षा मोठं काही नाही,” असे नरेंद्र मोदींन यावेळी म्हटले.“कमी स्त्रोत असताना भारतानं, जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणं स्वभाविक आहे. देशातल्या राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत चांगलं काम केले आहे. या सगळ्या प्रयत्नांनंतरही करोना ज्याप्रकारे जसा पसरतोय, त्याने सगळ्यांना सतर्क केले आहे.
भारतात पण करोनाच्या विरोधात आता लढाई कशी करायची, विजयी कसे व्हायचे, नुकसान कमी कसं होईल, लोकांचे हाल कमी कसे होतील यावर राज्यांबरोबर चर्चा होत आहे. सगळेजण हाच पर्याय देतात की लॉकडाउन वाढवायला हवा. अनेक राज्यांनी लॉकडाउन आधीच वाढवला आहे,” असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.