मुंबई – राज्यात विषाणूचा कोरोनाचा धोका वाढणार आहे. पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कोरोनाशी आपण चांगले लढत आहोत. पण यापुढची स्थिती अधिक बिकट असणार आहे. त्यामुळे या कोरोनाचा गुणाकार वाढत जाईल. धोका वाढेल, पण काळजी करण्याचं कारण नाही. आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत.