उंब्रज – गेल्या पंचवीस वर्षापासून जनतेला पोकळ आश्वासने देवून ज्यांनी झुलवत ठेवले. अशा लोकप्रनिधीना जनता आता कंटाळली आहे. जनतेला शाश्वत विकास हवा असून त्यासाठी परिवर्तनाचा लढा उभारला आहे. गत निवडणुकीत जनतेने मला साथ दिली. मात्र मतांची विभागणी झाल्यामुळे पराभव स्विकारावा लागला. पंरतु या निवडणुकीत परिवर्तन करणारच. उत्तरच्या विकासासाठी बदल घडवूया, असे आवाहन धैर्यशील कदम यांनी केले.
उंब्रज, ता. कराड येथील मेळाव्यात धैर्यशील कदम यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच अशी गर्जना केली. मेळाव्यास हिंदूराव चव्हाण, सुदाम दीक्षित, अविनाश साळुंखे, प्रमोद ढाणे, भीमराव डांगे वसंत पाटील, वसंतराव जाधव, मधुकर जाधव, दत्तात्रय साळुंखे, उमेश मोहिते, अमित जाधव, यशवंत चव्हाण, संजय जाधव, महेश काशीद, सचिन डुबल, पांडुरंग सावंत, रामभाऊ घाडगे, धनाजी जाधव, मानसिंग जाधव, सुनील यादव, भीमराव थोरात, विकास जाधव, अजित माने, अमोल जाधव, विजय शिंदे, राहुल उकिरडे, प्रकाश पाटील, अमोल पाटील, महेश काशीद, संजय जाधव, दीपक खडंग, प्रमोद गायकवाड, सुरेश थोरात उपस्थित होते.
धैर्यशील कदम पुढे म्हणाले, इंदोली व पाल योजना 50 मीटर हेडवरून 100 मीटर हेडपर्यंत करण्याचा प्रश्न तसेच शामगाव गावात टेंभू योजनेचे पाणी मिळावे. हे प्रश्न 25 वर्षात आमदारांना सोडवता आले नाहीत. ते प्रश्न आम्ही नामदार गिरीश महाजन त्यांचेकडून मार्गी लावले. निवडणुका आल्या की हणबरवाडी, धनगरवाडीवर बोलायचे. परंतु पी. डी. पाटील साहेबांनी तीस
वर्षांपूर्वी केलेल्या योजनानंतर तुम्ही काय केले. हणबरवाडी- धनगरवाडी योजना का झाली नाही, पंधरा वर्षे तुम्ही सत्तेतील आमदार होता. तुमचे कोणी हात बांधले होते का, या मतदारसंघातील जनतेची चेष्टा लावली आहे, अशी टीका धैर्यशील कदम यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत कारखान्यावर बोलायचे व कारखान्याच्या निवडणूकीत विधानसभेवर बोलायचे. जनतेची नुसती चेष्टा लावलेली आहे. ऊसाच्या प्रश्नांवरुन शेतकऱ्यांना कात्रीत पकडून आजपर्यंत कराड उत्तरचे राजकारण सुरू होते. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येवून वर्धन अँग्रोची निर्मिती केली असून गाडी रुळावर यायला लागली आहे. दोन वर्षात शेतकऱ्यांना उंच्चाकी दर देण्यात वर्धन कुठेही कमी पडला नाही.
2014 ची निवडणूक लढवली. मात्र मतांची विभागणी झाली त्याचा फायदा विद्यमान आमदारांना झाला. परंतु हा पराभव एकट्या धैर्यशील कदमांचा झाला नाही तर मला मत दिलेल्या 60 हजार लोकांच्या जिव्हारी लागला आहे. जनता आता जागृत झाली असून कशामुळे पराभव वाट्याला आला हे जाणून आहे. या मतदार संघातील सहा जिल्हा परिषद गट विद्यमान आमदारांच्या विरोधातील आहेत. ही लढाई एकट्या धैर्यशील कदमांची नसून सर्वसामान्य लोकांची आहे. तुम्हीच माझ्या पायात बळ भरा. सर्वाच्या माना अभिमानाने उंचावतील, असे काम करुन दाखवीन.
ऍड. महादेव साळुंखे म्हणाले, धैर्य आणि शील असणाऱ्या नेतृत्वाची कराड उत्तरला गरज आहे. मतदार संघातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे तसेच असून कुणालाही आपल्यापेक्षा मोठे होवू द्यायचे
नाही असे घाणेरडे राजकारण सुरू आहे. म्हणूनच धैर्यशील कदम यांच्या सारख्या तळमळीने झटणाऱ्या व जनतेच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहीजे. बदल करा विकास होईल, पंचवीस वर्षांत न सुटलेले प्रश्न सोडवण्याची ताकद या नेतृत्वात आहे असे साळुंखे म्हणाले. यावेळी उंब्रज जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.