मंचर -लौकी (ता. आंबेगाव) येथील मधलामळा याठिकाणी मानवी वस्तीत बिबट्याने शिरकाव केला आहे. बिबट्याने शुक्रवारी (दि.15) कळपावर हल्ला करून बोकड आणि मधल्या मळ्यातील कुत्र्याचा फडशा पाडला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मेंढपाळ राजेंद्र सुळ यांचा शेळ्या-मेंढ्याचा कळप सध्या शेतकरी बाळू सीताराम थोरात यांच्या शेतात मुक्कामाला आहे.बिबट्याने कळपाच्या कडेला बांधलेल्या जाळीवरून रात्री एक वाजता कळपात उडी मारून प्रवेश केला होता.