नगर (प्रतिनिधी) – नगर शहारात आता मोठ्या प्रमाणात बाहेर गावाहून नागरिकांचे लोंढे येत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ही भीती कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्याच पुढाकाराने स्थापन झालेल्या सुरक्षा समितीला निर्णय घेण्याचे विशेष अधिकार द्यावेत, अशी भूमिका महापालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी स्पष्ट केली.
मनपा क्षेत्रात करोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सुरक्षा समिती गठीत करण्यात आल्या आहेत. त्या समितीच्या बैठकीत ते बोलत होते. माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, पहिलवान शिवाजी चव्हाण आदींनी हीच भूमिका मांडली.
बाहेरून आलेल्या नागरिकांना समितीशी संपर्क करुन आपली तपासणी करुन घ्यावी. आपल्या शेजारी कोणी बाहेरून आलेले असल्याच त्याची माहितीत्काळ मनपास कळवे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णांची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार समितीमधील डॉक्टरांना दिल्यास नागरिकांना होणारा त्रास थांबेल. त्यामुळे सुरक्षा समितीला निर्णय घेण्याचे आधिकार द्यावेत. अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.