कोयनानगर – दोन वर्षांपूर्वी कोयना परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथे झालेल्या भूस्खलनात मनुष्यहानी आणि मोठी वित्तहानी झाली होती. या बाधित तीन गावांमधील नागरिकांचे पुनर्वसन करून, कायमस्वरूपी घरे देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
बाधितांना घरे बांधून देण्याची जबाबदारी असलेल्या एमएमआरडीएच्या पथकाने मिरगाव, हुंबरळीतील बाधितांच्या पुनर्वसनासाठी निवडलेल्या जर्मन टेकडीची पाहणी करून, तेथे सर्व सोयी उपलब्ध करून देण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला केल्या. ढगफुटीसदृश पावसामुळे 22 जुलै 2021 रोजी मिरगाव, हुंबरळी, काठेवाडी, ढोकावळे या गावांवर डोंगर कोसळून मनुष्यहानी झाली होती. भूस्खलनात बेचिराख झालेल्या या गावांच्या पुनर्वसनाची मागणी तत्कालीन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई
पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
भूस्खलन झाले, तेव्हा महाविकास आघाडी सत्तेवर होती. त्या सरकारमध्ये गृह राज्यमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनी कोयनेत तळ ठोकून आपत्तीग्रस्तांना दिलासा दिला होता. कोयना प्रकल्पाच्या वापराविना पडून असलेल्या इमारती नव्याने बांधून, तेथे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येईल. त्यानंतर कायमस्वरूपी घरे देण्यात येतील, असा शब्द दिला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार होऊन, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत देसाई यांनी या प्रस्तावाला मान्यता घेतली.