नवी दिल्ली : दि इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी भारतात कोरोना चाचणी बाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. मात्र भारतात अद्याप कोरोनाचा सामुहिक प्रसार झाला नसल्याचे म्हटले आहे. परदेशात न गेलेल्या पण फ्लू सारखी लक्षणे असणाऱ्या सर्वांचे नमुने चाचणीसाठी घेण्याच्या प्रक्रियेला वेग दिला जाईल, असे त्यात म्हटले आहे.
भारतात कोरोनाचे 125 बाधीत आढळले आहेत. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारताने चाचणीची कडक आचार संहिता बनवली आहे. त्यातील काही प्रमुख तरतुदी
भारतात सामुहिक प्रसार नाही.
बाधीत देशातून आलेल्या अथवा पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटच्या सहवासात आलेल्यांनाच बाधा झाल्याचे निष्पन्न
फ्लू सारखी लक्षणे असणाऱ्यांची सामुहिक चाचणी
भारतात प्राथमिक चाचणी घेण्यासाठी भारतात 67 लॅबरोटरी सुरू करण्यात आली असली तरी सरकारी लॅबरोटरी चाचणीचा फार मोठा ताण सध्या पडत नाही. भारताची राखीव क्षमता चांगली असल्याचे आयसीएमआरने जाहीर केले आहे.
या बाधीतांच्या लघू चाचण्यांवर त्यांना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कारण परदेशातून जे आले किंवा त्यांच्या अथवा त्यांच्या पाहुण्यांच्या संपर्कात जे आले, त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
या साथीचे दोन टप्पे आहेत. एक आयात बाधीत आणि दुसरे म्हणजे स्थानिक प्रसारण. आपल्याला या दोन टप्प्यापर्यंत घाबरण्याचे कारण नाही. तिसरा टप्पा हा सामुहिक प्रसारणाचा आहे. आणि पाचवा टप्पा हा साथीचा आहे, असे आयसीएमआरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितले.
भारताची चाचणी धोरण हे दक्षिण कोरीयाच्या उलट आहे. तेथे आतापर्यंत एक लाख 40 हजार जणांची चाचाणी घेण्यात आली आहे. सुमारे दहा हजार जणांच्या दररोज चाचणी घेतली जात आहे. भारताशिवाय कमी चाचणी घेणाऱ्या देशांत अमेरिकेचा समावेश आहे.