नवी दिल्ली: भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे.आरोग्य मंत्रालयानेदिलेल्या माहिती नुसार, देशात शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1 हजार 334 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून, गेल्या 24 तासांत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 3 लाख 86 हजार 791 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून, कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 507 जणांचा बळी गेला आहे.
54 other districts in 23 States/Union Territories didn't report any cases in last 14 days. 2,231 patients have been cured so far in the country: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry https://t.co/qoNzrqtodO
— ANI (@ANI) April 19, 2020
रविवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावरील लस आणि औषध परीक्षणासाठी उच्चस्तरीय कमिटी तयार करण्यात आली आहे. तसेच कोरोना विरूद्ध लस तयार करण्यासाठी जैव तंत्रज्ञान विभागाची केंद्रीय समन्वय एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर, 20 एप्रिलपासून हॉटस्पॉट्स प्रतिबंधित भागात कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. चित्रपटगृह, धार्मिक स्थळे 3 मेपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात देशभरात 757 रुग्णालये आणि 1 हजार 389 आरोग्य सेवा केंद्रे अधिकृत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनचे पूर्ण पालन केले पाहिजे. जे हॉटस्पॉट्स आणि कंटेनमेंट झोनमध्ये नाहीत, त्यांनी काळजी घेतली पाहिजे. लॉकडाऊनची सूट मिळालेल्या जिल्ह्यात पूर्णपणे नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. ग्रामीण भागातही अनेक प्रकारची सूट देण्यात आली आहे. सरकारी निर्देशाचे पालन करण्यासाठी गामीण भागात पोलिसांची गस्त जाहली पाहिजे. शिबिरात राहणाऱ्या कामगारांच्या जेवणाची गुणवत्ता चांगली असायला हवी असं निर्देशात म्हटले आहे. तसेच 14 दिवसांपासून 23 राज्यांतील 54 जिल्ह्यांमध्ये कोणतेही नवीन रुग्ण आढळले नाही,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.