मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजप यांच्या संयुक्त सरकारवर विरोधकांकडून वारंवार आरोप करण्यात येतात. विरोधकांकडून शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली असून राज्यातील काही नेत्यांच्या विरोधात मानहानीच्या नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या नोटिसीवरून आता माजी महापौर किशोरी पेडणेकर शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’शिंदे गटाच्या आमदारांनी खोके घेतलेत आणि त्याचा आमच्याकडे पुरावा आहे, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलंय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गुवाहटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप वारंवार केला जातोय. पण हे आरोप कोर्टात सिद्ध करा.’ असेही त्या म्हणाल्या आहे.