बेंगळुरू – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात एक असा असामी दिसून आला की, त्याने कित्येक खेळाडूंचे लिलावातील भाव वाढवून ठेवले. दिल्ली कॅपिटल्सचे हे सदस्य असलेले किरणकुमार गांधी यांनी लिलावात काही ठरावीक खेळाडूंवर सातत्याने मोठ्या रकमेची बोली लावली व अन्य संघांना स्पर्धा करण्यास भाग पाडले.
जेव्हा त्याच्यापेक्षा जास्त बोली लावून अन्य संघ त्या खेळाडूचे नाव घ्यायचे तेव्हा मात्र किरणकुमार शांत बसायचे. त्यांच्या याच कृतीने यंदाच्या लिलावात रंगत आली. जे संघ किरणकुमार यांच्यापेक्षा जास्त बोली लावायचे म्हणून या संघांना त्या खेळाडूला खरेदी करण्यावाचून पर्यायच उरायचा नाही. अनेकांच्या पर्स खाली करण्यात किरणकुमार यांच्या या रणनितीची चर्चा रंगली होती.