लंडन :- कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना जी 20 परिषदेसाठी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या मेजवानीचे निमंत्रण दिले गेले नाही, भारत सरकारने भारताच्या 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विरोधी पक्षांचा या कृतीतून अपमान केला आहे असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
ब्रसेल्स येथील ब्रसेल्स प्रेस क्लबमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गांधी म्हणाले की, सरकारची ही कृती त्यांच्या मनोवृत्तीचे निदर्शक आहे. त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याला (खर्गे) आमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही कृती तुम्हाला काहीतरी सांगते. हे तुम्हाला सांगते की ते भारताच्या 60% लोकसंख्येच्या नेत्यांना सरकार महत्त्व देत नाहीत,असे ते म्हणाले.
ते म्हणाले, की लोकांना असे करण्याची गरज का वाटत आहे आणि त्यामागे कोणता विचार आहे याचा विचार केला पाहिजे. गांधी सध्या बेल्जियम, फ्रान्स आणि नॉर्वे या तीन देशांच्या युरोपीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी ब्रुसेल्समध्ये युरोपियन संसदेच्या (एमईपी) काही सदस्यांसोबत बैठकाही घेतल्या.