नवी दिल्ली – दिल्लीतील आप सरकारने गेल्या १० वर्षांत शहरात ६३ उड्डाणपूल बांधले आहेत आणि नागरिकांना सर्व शक्य लाभ दिले आहेत असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
मोती नगर येथे तीन पदरी उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना केजरीवाल म्हणाले की यामुळे प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होईल आणि त्यांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल. या उड्डाणपुलामुळे लोकांना ट्रॅफिक जॅमपासून दिलासा मिळणार आहे.
आम्ही सत्तेत आल्यापासून जवळपास ६३ उड्डाणपूल बांधले आहेत. मागील सरकारांनी ७५ वर्षांत जे काही केले, ते आम्ही गेल्या १० वर्षांत केले आहे. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती लागते असे ते म्हणाले. केजरीवाल म्हणाले की आम आदमी पार्टी (आप) सरकारने नागरिकांना मोफत वीज ते चांगल्या शिक्षणापर्यंत सर्व शक्य फायदे दिले आहेत.
आमच्या सरकरी शाळा इतक्या चांगल्या आहेत की गरीब आणि श्रीमंतांच्या मुलांमध्ये तेथे फरक नाही. आम्ही सरकारी रुग्णालये उत्तम दर्जाची केली आहेत, मोहल्ला दवाखाने उघडले आहेत, महिलांना मोफत बस प्रवास सवलत दिली आहे,असेही ते म्हणाले.