– दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २ हजारांची न मागे घेण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. अशिक्षित पंतप्रधानाला कोणी काहीही सांगतं, त्याच्या काही लक्षात येत नाही. मात्र भोगावं जनतेला लागतं असा तिखट प्रहार केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांनी यापूर्वीही पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेवर बोट ठेवून टीका केली आहे.
केजरीवालांनी नेमकं काय ट्विट केलंय?
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर केजरीवाल लिहतात, “आधी सांगितलं २ हजारांच्या नोटेमुळे भ्रष्टाचार संपेल. आता म्हणतायेत २ हजाराची नोट बंद केल्यानं भष्टाचार संपेल. यामुळे आम्ही म्हणतो PM सुशिक्षित असावा. एका अशिक्षित PM ला कोणी काहीही सांगतं. त्याच्या लक्षात येत नाही. भोगावं जनतेला लागतं.” केजरीवाल यांच्या या टीकेला भाजप नेते कोणत्या शब्दात उत्तर देतात हे पहावं लागणार आहे.
पहले बोले 2000 का नोट लाने से भ्रष्टाचार बंद होगा। अब बोल रहे हैं 2000 का नोट बंद करने से भ्रष्टाचार ख़त्म होगा
इसीलिए हम कहते हैं, PM पढ़ा लिखा होना चाहिए। एक अनपढ़ पीएम को कोई कुछ भी बोल जाता है। उसे समझ आता नहीं है। भुगतना जनता को पड़ता है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 19, 2023
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार व दिल्लीचे उपराज्यपाल अर्थात LG यांच्या अधिकारक्षेत्रांबाबत निर्णय दिला होता. यानंतर आता केंद्र सरकारतर्फे एक अध्यादेश काढण्यात आला असून याद्वारे, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलेले अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार पुन्हा उप राज्यपालांकडे देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या या अध्यादेशामुळे भाजप विरुद्ध आप असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री व आप नेते भगवंतसिंह मान यांनी याबाबत ट्विट करताना, देशाच्या संविधानाची हत्या करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद असती तर आज सर्व भाजपला फाशीची शिक्षा द्यावी लागली असती असे ट्विट केले आहे.