नवी दिल्ली – देशाची आणि विद्यार्थ्यांची सेवा करणाऱ्यांना आज तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांनी केला आहे. या संबंधात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर जी अन्याय्य कारवाई करण्यात आली आहे, त्याचे वर्णन केजरीवाल यांनी हिरण्यकश्यपु आणि प्रल्हाद यांच्या पौराणिक प्रसंगाशी तुलना करून केले आहे.
केजरीवालांनी म्हटले आहे की, ज्याप्रमाणे हिरण्यकशिपू प्रल्हादला देवपूजेपासून रोखू शकत नाही, त्याचप्रमाणे आधुनिक काळातील प्रल्हादालाही त्यांना रोखता येणार नाही. त्यांनी मनीष सिसोदिया यांचा उल्लेख त्यांचे नाव न घेता प्रल्हाद असा केला.केजरीवालांनी ट्विटरवर म्हटले आहे की, हिरण्यकशिपूने स्वतःला देव समजायला सुरुवात केली होती.
प्रल्हादला देवाच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले आणि त्याच्यावर अत्याचार केले. आजही काही लोक स्वतःला देव समजू लागले आहेत. देशाची आणि विद्यार्थ्यांची सेवा करणारा प्रल्हादही आज असेच त्रास भोगतो आहे. पण पुराणकाळातहीं हिरण्यकश्यपु तेव्हा ना ते प्रल्हादला रोखू शकला, ना आताही त्यांना ते करता येणे शक्य आहे असेही त्यांनी हिंदी भाषेतील ट्विटमध्ये म्हटले आहे.