तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाचा कविकुलगुरू कुसुमाग्रज पुरस्कार कलापिनी संस्थेचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांना प्रदान करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, कवी प्रवीण दवणे उपस्थित होते. तसेच लेखक अभिजित काळे ,नलिनी राजहंस आदींचाही या वेळी सन्मान करण्यात आला. तसेच मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण मुळे यांचाही अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर पंडित सुरेश साखवळकर, राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ, जयंत जोर्वेकर, भास्कर पुंडले उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष प्रा. जयंत जोर्वेकर, पंडित सुरेश साखवळकर, श्रीकृष्ण मुळे यांनी मराठी राजभाषा गौरव दिनाचे महत्व विशद केले. या वेळी डाॅ. नेहा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले केले.