सविंदणे (वार्ताहर ): सविंदणे ,कवठे येमाई , परिसरामध्ये बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले केले होते . सध्या ऊस तुटून गेल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा नसल्यामुळे तो मानवी वस्तीकडे धाव घेत आहे. ढाकीवस्ती परीसरात मेंढपाळाच्या घोडी, बकऱ्यावर बिबटयाने हल्ले करून ठार केले होते. कवठे येमाई ग्रामस्थांच्या मागणीनुसार ढाकी वस्ती या ठिकाणी शिरूरचे वनपरिक्षेत्राचे आधिकारी मनोहर मस्केकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता.
पिंजऱ्यात सावज ठेवल्यामुळे या पिंजऱ्यामध्ये तीन वर्ष वयोगटाचा बिबट्या अडकला. व त्याला तातडीने माणिकडोह येथील निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. लोकांनी रात्रीच्यावेळी मध्ये शेतात पाणी भरण्यासाठी जाताना काळजी घ्यावी. टॉर्च ,काठीचा वापर करावा. रात्रीच्या वेळी बाहेर झोपू नये .पाणी भरताना मोबाईलची गाणी लावावीत . पाळीव जनावरांना कुपंनाच्या आत किंवा बंदिस्त गोठ्यात बांधावे. असे आवाहन शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे.