सोमेश्वरनगर- येथील परिसरात पावसाने दुपारी तीनच्या सुमारास दमदार हजेरी लावली. करंजे येथील ओढ्याला पाणी आल्याने तुडुंब भरलेला आहे. गेल्यावर्षी झालेल्या पावसाने हा करंजेचा ओढा तुडुंब झाला होता.
परिसरातील चौधरवाडी, रासकर मळा, करंजे, करंजेपूल, मुरूम, वाणेवाडी, होळ, वाघळवाडी, निंबूत आदी गावांमध्ये शेतात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे थोड्या फार प्रमाणात नुकसान होऊ शकते, परंतु पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.