कर्जत : कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर माणसांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी अधिक महत्व प्राप्त झाले आहे, या पार्श्वभूमीवर कर्जत कृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरावर रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, या महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी आदिवासी महिला शेतकरी जाईबाई फसाळ व ताईबाई फसाळ यांचे फूल देऊन अभिनंदन केले. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील देवदत्त जोंधळे यांनी विद्यापीठाने विकसित केलेला वडीचा अळू माठ, शेवगा व त्यांचे खत नियोजन यावर तांत्रिक मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शेवाळे यांनी नैसर्गिक विषमुक्त शेतीचे विवेचन केले, तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोहयो फळबाग लागवड करण्याचे आवाहन केले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्याचे आदिवासीबहुल असल्याचे महत्त्व विशद करताना कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरेल, असे मॉडेल तयार करावे. एपीएमसी वाशीसारखे छोटेखानी मॉडेल कर्जतमध्ये निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला. या कार्यक्रम कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे सहयोगाने तालुका कृषी अधिकारी कर्जत यांनी यशस्वी केला. या वेळी कृषी पर्यवेक्षक सचिन केणे यांनी आभार मानले. या महोत्सवाची संकल्पना दादा भुसे यांच्याकडून मिळाली.
या वेळी आमदार महेंद्र थोरवे, प्रमुख उपस्थिती प्रा. देवदत्त जोंधळे, प्रा. प्रवीण वनवे, मार्गदर्शक शितल शेवाळे, तालुका कृषी अधिकारी धनाजी सरडे, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण जाधव, मंडळ कृषी अधिकारी रमेश चौगुले, रेश्मा मते, मिनल देशमुख, कृषी पर्यवेक्षक सचिन केणे आदी उपस्थित होते.