कर्जत – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन मुले अनेकांचे रोजगार गेले त्यातच दुर्गम भागातील आदिवासींना आपला उदरनिर्वाह करणे या काळात कठीण गेले केवळ हातावर पोट असणाऱ्या या गरीब आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, याकरिता कर्जत तालुक्यात कार्यरत असणाऱ्या, शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असलेल्या स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन (मुंबई) या सेवाभावी संस्थेने हाताला काम नसणाऱ्या आदिवासी भागातील कुटुंबाना दिवाळी सणाची अनोखी भेट देऊन आदिवासी समवेत दिवाळी सण साजरा केला.
वारे ग्रामपंचायत हद्दीतील करकुल व विकासवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील एकूण 70 कुटुंब आहेत. केवळ मोलमजुरी करूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; मात्र या करोनाच्या काळात मजुरी मिळणेही मुश्किल झाल्याने या आदिवासींवर मोठं संकट आले आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढे आलेली दिवाळी ही कुटुंब कशी पद्धतीने साजरी करतील, या विचारातून स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन (मुंबई) यांनी या दोन्ही वाड्यांचा सर्व्हें करून आरोग्यदायी दिवाळी हा उपक्रम राबवायच ठरवले वस्तीवर जाऊन सुमारे 70 कुटुंबाना धान्यवाटप तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर या कार्यक्रमाचे औचित्य साधून नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेत उपस्थीत राहून वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडवत आदिवासींना दीपावलीचा फराळ व मुलांना खाऊच वाटप केले. पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असताना आपण समाजाचे काही देणं लागतो या भावनेने ते आपल्या आयुष्यतील प्रत्येक आनंदाचा क्षण, ते एखादा सामजिक उपक्रम राबवून करतात, यावेळी या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबासह आदिवासींच्या वस्तीवर जाऊन त्यांना दिवाळी फराळ तसेच बलचमुंना खाऊचे वाटप केले.
या वेळी त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक तात्यांजी सावंजी, पोलीस हवालदार नाईक यांसह स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष विजयजी कोणार, संस्थेचे पदाधिकारी राकेश कदम, भूषण पेडणेकर, शुभांगी पेडणेकर, किशोर वेखंडे, यश वेखंडे, युवराज फरकते, मनिष सावंत, सुहास माने, कृष्णा शिंदे, भूषण जाधव, कल्लोळ चंदा, हितेश पाटील, महेश राणे, चंद्रकला राणे, राज्य आदर्श शिक्षक रवी काजळे, भागूचिवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी उपस्थित होते.