नवी दिल्ली – साधारण एक वर्षापुर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या सुमारास कॉंग्रेसचे तेव्हाचे नेते आणि उत्तर प्रदेशातील ब्राह्मण चेहरा जितीन प्रसाद यांनी कॉंग्रेसला अखेरचा रामराम केला होता. त्यांनी नंतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे अन आज ते उत्तर प्रदेशात मंत्री आहेत.
त्यावेळी प्रसाद यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावरून कॉंग्रेसचे तेव्हाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी प्रसाद यांच्यावर निशाणा साधला होता. त्याची आज प्रसाद यांनी परतफेड केली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे या राहुल गांधी यांच्या निकटच्या सहकाऱ्यानंतर जितीन यांनीही राहुल यांची साथ सोडत भाजपचा हात धरला होता. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये सगळेच चकित झाले होते. कारण जितीन यांचा कॉंग्रेसशी तीन पीढ्यांचा संबंध होता. त्यामुळे सिब्बल यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. काहीतरी प्रसाद त्यांना मिळणार आहे की हे केवळ निवडणुकीच्या तोंडावरील पक्षांतर आहे, हा प्रश्न आहे अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली होती.
त्यावर आता ट्वीट करत जितीन प्रसाद यांनी परतफेड केली. मि. सिब्बल आता प्रसाद कसा आहे, असा सवाल त्यांनी सिब्बल यांना विचारला आहे.