Kapil Patil letter । लोकसभा निवडणूक लागल्यापासून मविआमधील नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला आपल्याबरोबर घेण्याचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न अपुर पडले. जागावाटपात मविआ आणि वंचितमधील चर्चा फिस्कटली आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील अनेक जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर आंबेडकरांनी बारामतीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यासह काँग्रेसच्या काही उमेदवारांना वंचित पाठिंबा देईल, असंही आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. मात्र महाविकास आघाडीने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे.
कपिल पाटील यांचे शरद पवारांना पत्र Kapil Patil letter ।
दरम्यान, महाविकास आघाडीमधील एका पक्षाच्या प्रमुखांने यावर नाराजी व्यक्त करत मविआचे प्रमुख नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा करू नये यासाठी शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) आणि उद्धव ठाकरे (ठाकरे गटाचे प्रमुख) यांना प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील यांनी पवारांना पत्र लिहून काँग्रेसच्या उमेदवाराविरोधातही नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही. म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे, याबाबत कपिल पाटील यांनी पत्रात जाहीर नाराजी व्यक्त केलीय .
कपिल पाटील नेमकं काय म्हणाले पत्रात? Kapil Patil letter ।
म्हणून अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा
आदरणीय श्री. शरद पवार साहेब
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र हा फुले – शाहू – आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला… pic.twitter.com/CLYCE9uwiS— Kapil Patil (@KapilHPatil) April 13, 2024