कामशेत, (वार्ताहर) – खडकाळा (कामशेत) ग्रुप ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या प्रबळ ग्रामपंचायत आहे. परंतु, या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक मुलभूत समस्या असून त्या सोडविण्यास ग्रामपंचायतीला अपयश येत आहे.
मागील काही कालावधीमध्ये ग्रामसेवक नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. प्रभारी ग्रामसेवक म्हणून शिंदे याची नियुक्ती झाल्यानंतर ही समस्या तशाच आहेत. कचरा व्यवस्थापन, उघड्यावरच्या गटारी, आठवडे बाजाराचे नियोजन नाही, वाहतूक कोंडीची समस्या,छोट्या व्यापारांकडून केलेले अतिक्रमण आदींविषयी ग्रामपंचायत इकडून कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. कर आकारला जातो.
परंतु, समस्या दूर केल्या जात नाहीत. यावर ग्रामपंचायत काही मार्ग काढणार का नाही? असा प्रश्न नागरिक करत असून अनेक समस्या ते व्हाट्सॲप ग्रुपवर मांडत आहेत. मात्र, त्यावर समस्या कामशेत शहरांमधील जागरूक नागरिक अनेक समस्या व्हाट्सॲप ग्रुपवर मांडत आहेत. तरी ग्रामपंचायत शांत का? शहरात समस्यांचा डोंगर असताना ग्रा
कचऱ्याचे ढीग, पिण्याचे गढूळ पाणी, अनधिकृत पार्किंग
कामशेत शहरात आठवडे बाजार भरतो. या आठवडे बाजारामध्ये होणारा कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जातो. या कचऱ्यांचे व्यवस्थापन ग्रुप ग्रामपंचायतला करता येत नाही. तसेच शहरातील गटारे बंदिस्त नाहित. काही गटारांमध्ये पाणी साचून राहिले आहे. शहरात दोन मोठ्या टाक्या व दोन फिल्टर टॅंक बांधले आहेत.
तरी तिन्ही ऋतूंमध्ये नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होतो. ७० ते ८० गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कामशेत शहरात छोटे व्यापारी शहरातील मुख्य रस्त्यामध्ये अनाधिकृत पद्धतीने व्यापार करत असून प्रमुख रस्त्यांच्या कडेला हातगाड्या लावल्यामुळे वाहतूक कोंडी होते. रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची गाडी शहरामध्ये येण्यासाठी ही जागा रहात नाही. ग्रामपंचायतीकडून कर आकारला जातो.
परंतु, सुविधा दिली जात नाही. तसेच मुख्य बाजारपेठेतील स्वच्छतागृह काही दिवसांपासून बंद आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकमधील अतिक्रमण २०१३ हटवून मोकळ्या केलेल्या जागेत अनधिकृत फ्लेक्स, उभारण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून गाड्या पार्क केल्या जात आहेत.
मागील अनेक वर्षांपासून कचऱ्याच्या जागेसाठी वर्षाला सात लाख रुपये एवढे भाडे ग्रामपंचायत भरत असून सुद्धा शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे.- अमित शिंदे, कामशेत
ग्रामपंचायतीकडून येणारे पाणी अजूनही गढूळ येत आहे. या गढूळ पाण्यामुळे आजारांना आमंत्रण दिले जात आहे. तरीही ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. फिल्टर टॅंक असूनही गढूळ पाणी का ? – राजेश जोशी, नागरिक, कामशेत