नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. JNU मध्ये झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट असून यामध्ये भारतीय विद्यार्थी परिषद या भाजपशी निगडित विद्यार्थी संघटनेचा हात असल्याचा थेट आरोप जखमी विद्यार्थी व विरोधी पक्षांकडून केला जात आहे तर भाजपकडून JNU हल्ल्यामध्ये विरोधकांचा हात असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, JNU हल्ल्याप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक सिनेकलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. या हल्ल्यानंतर आयुष्यमान खुराणा याने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून व्यक्त होताना स्वतः रचलेली एक कविता शेअर केली आहे. या कवितेद्वारे त्याने भारतातील लोकशाही मूल्यांची आठवण करून देतानाच मानवता धर्मापेक्षा अन्य कोणताही धर्म मोठा नसून इतरांची विचासरणी वेगळी आहे म्हणून त्यांच्यावर हल्ला करणं योग्य नाही असा संदेश दिला आहे.
इंसानियत से बड़ा कुछ नहीं
धर्म नहीं, सियासत नहीं.
धन नहीं, विरासत नहीं.
किसी की हो सोच नई,
हो अलग तो अलग सही,
पर तुझे उस सोच को नोचने का हक़ नहीं,
यही भारत का लोकतंत्र है,
और इसमें किसी को शक़ नहीं।
-आयुष्मान
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) January 6, 2020