मुंबई – गेल्या मंगळवारी 54 पैशांच्या घसरगुंडीसह रुपयाचे मूल्य 77.40 या पातळीवर गडगडले आहे त्यामुळे सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. दूध, अंडी, भाजीपाला, फळे, चिकन, मासे आणि प्रवास वाहतुकीची भाडी यात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. सीएनजी आणि घरगुती गॅस सिलिंडर यांच्या दरात सातत्याने भर पडत चालली आहे.
अन्नधान्य व इतर वस्तूंच्या किमती भडकून सर्वसामान्याच्या खिशावरील भार वाढणारच आहे. वाढत्या महागाईच्या मुद्यावरून आता माध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वर्षांपूर्वी म्हणाले होते,’देश का रुपया जब गिरता है तब देश की इज्जत उतर जाती है’ मात्र आता माझ्या पद्धतीने तर मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर भारताची चड्डीच काढली आहे. त्यावरही कुणी बोलत नाही”, असं आव्हाड यांनी जहरी टीका केली आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या या टीकेमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. आव्हाड यांच्या टिकेवर भाजप पक्षाकडून काय प्रतिउत्तर येते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.