मुंबई – शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील फूट (ncp split) पडली आणि अजित पवार हे भाजपसोबत (bjp) सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादीतील (ncp) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. अशात आज निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीसाठी शरद पवार हे देखील हजर झाल्याचे पाहायला मिळाले.
आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे असं म्हणत जयंत पाटील (jayant patil) यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे अजित पवार गटाच्या वकिलांनी यावेळी निवडणूक आयोगासमोर मांडले.पक्ष घटनेचं पालन होत नाही असंही अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. जेष्ठ वकील मणिंदर सिंह यांनी अजित पवार गटाकडून युक्तिवाद केला.दोन तासांचा युक्तिवाद आजच्या दिवशी पार पडणार आहे.
शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून पक्ष घटनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. अजित पवार गटाकडून विधानसभेच्या ४२ आमदार,विधान परिषदेतील ६ आमदार तर नागालँडचे सात आमदार आमच्यासोबत असल्याचे अजित पवार गटाने यावेळी आयोगासमोर सांगितले. आयोगासमोर १ लाख ६२ हजार प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाने सादर केल्याचे समजते.
2 जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधला अजित पवार गट (Ajit pawar group) सत्तेत सामिल झाला. दुसरीकडे शरद पवार गटाने विरोधी पक्षात राहणार असल्याचं जाहीर केलं.त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र देऊन पक्षाध्यक्ष पदी अजित पवारांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर आज पहिल्यांदाच निवडणूक आयोगात सुनावणी सुरु झाली.यावेळी शरद पवारांसह त्यांचे वकील देखील हजर होते.