More than 300 farmers have lost their lives in protest. Thousands of youngsters are losing jobs everyday. Petrol, diesel, LPG rates are the highest ever and the financial condition of country is in the ICU.
How to wake-up the kumbhakaran sarkar?#WorldSleepDay
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 19, 2021
लस निर्यातीवरूनही केंद्रसरकारवर साधला होता निशाणा
यापूर्वी जयंत पाटील यांनी पाकिस्तानला कोरोना लस निर्यातीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, भारतीयांसाठी लसी कमी पडत असताना केंद्राला पाकिस्तान आणि इतर देशांची काळजी आहे. देशातील नागरिकांसाठी लसीचा तुटवडा असताना लस निर्यात करत पाकिस्तान व इतर देशांना जो दानशुरपणा आम्ही दाखवत आहोत त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे, अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी केली होती.
खरंतर देशातील जनतेला पहिले लसीकरण व्हायला हवे होते. जगाचीही काळजी करण्याचे औदार्य आमच्याकडे असल्यामुळे देशातील नागरिक थोडे मागे राहीले तरी चालतील अशी केंद्राची मानसिकता दिसत असल्याचा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला होता.