मुंबई – जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावल्यानंतर अनेक दिग्गज प्लेअर भारतीय संघातील खेळाडूंवर आपला राग काढत आहेत. भारताच्या पराभवासाठी आयपीएलही जबाबदार असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सौरव गांगुलीने कर्णधार रोहित शर्माची पाठराखण करत विश्वचषक जिंकण्यापेक्षा आयपीएल जिंकणे कठीण असल्याचे म्हंटले आहे.
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा किताब पटकावला यावेळी भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यावरूनच अनेकांनी भारतीय टीमला नको ते सॅले द्यायला सुरुवात केली होती. यामध्ये स्वदेशी दिग्गज खेळाडूंसह विदेशातीलही काही खेळाडूंचा समावेश होता. आता दादाने रोहित शर्माचा बचाव करत एक भाष्य केलं आहे.
सौरव गांगुलीने नुकतेच आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, विश्वचषक जिंकण्यापेक्षा आयपीएल जिंकणे अधिक कठीण आहे. आयपीएलमध्ये तुम्हाला एकूण 14 सामने खेळावे लागतात आणि त्यानंतर प्लेऑफ आणि फायनल मॅच असते, परंतु वर्ल्ड कपमध्ये तुम्ही 4-5 सामने खेळून सेमीफायनलमध्ये पोहोचता, तर आयपीएलमध्ये तुम्ही एकूण 17 सामने खेळून चॅम्पियन बनता.
यासोबतच गांगुली म्हणाला की, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला फक्त रोहित शर्माच सर्वोत्तम कर्णधार म्हणून दिसला. तो पुढे म्हणाला, “बीसीसीआय त्यावेळी विराट कोहलीचे कर्णधारपद सोडण्यास तयार नव्हते. दक्षिण आफ्रिका दौरा नंतरही आमच्यासाठी खूप कठीण होता. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा हा त्यावेळी सर्वोत्तम पर्याय होता. .”