नवी दिल्ली: भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. “माझे राजकीय भविष्य उध्वस्त होईल याची मला चिंता नाही पण मी भारतीय क्षेत्रात चीनच्या घुसखोरीबद्दल खोटे बोलणार नाही.” असे राहुल गांधी म्हणाले त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. भारत आणि चीन यांच्यात 15 जून रोजी झालेल्या लष्करी संघर्षात 20 भारतीय सैनिकांच्या बलिदान देण्यात आले.
राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले – “चिनी सैन्याने भारतीय भूभाग ताब्यात घेतला आहे. सत्य लपवून ठेवणे हा देशद्रोह आहे. लोकांचे याकडे लक्ष वेधून घेणे हे देशभक्ती आहे.”
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, भारतीय म्हणून माझी पहिली प्राथमिकता देश आणि तिची जनता आहे. हे अगदी स्पष्ट आहे की चिनी लोकांनी आमच्या क्षेत्रात प्रवेश केला. ही गोष्ट मला त्रास देते. दुसर्या देशाने आपल्या क्षेत्रात कसे प्रवेश केला याबद्दल माझे रक्त उसळत आहे.”
The Chinese have occupied Indian land.
Hiding the truth and allowing them to take it is anti-national.
Bringing it to people’s attention is patriotic. pic.twitter.com/H37UZaFk1x
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2020
सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, “राजकारणी म्हणून तुम्हाला वाटते मी शांत बसावं. आणि आपल्या लोकांसोबत खोटं बोलावं. मी सॅटेलाइट फोटो पाहिले आहेत आणि सैन्यातील लोकांशी सुद्धा बोललो आहे. आपल्या हद्दीत चिनी सैनिक घुसले नाहीत, असे मी खोटं बोलावं तुम्हाला वाटत असेल तर मी खोटं बोलणार नाही. माझे राजकीय भविष्य बुडाले तरी चालेल. जे लोक चीन संदर्भात खोटे बोलतात ते देशभक्त नाहीत.