बेंगळुरू- नजिकच्या भविष्यकाळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणखी एका मोठ्या प्रकल्पावर काम करणार असून यत्या सहा वर्षांत म्हणजे वर्ष 2025 अखेर भारत स्वत:चे अंतराळ स्थानक अर्थात स्पेस स्टेशन उभारण्यात यशस्वी होईल, असे सांगण्यात येत आहे. एकीकडे आव्हानात्मक स्थितीत पोहोचलेल्या “चांद्रयान-2′ मोह्मितील नियंत्रण सुटलेल्या “विक्रम लॅंडर’शी संपर्क साधण्याचा प्रयत्नही इस्त्रो करत आहे. तर दुसरीकडे इस्रो भारताच्या पहिल्या मानव मिशन गगनयानवर देखील काम करत आहे. ही माहिती “इस्रो’ प्रमुख के. सिवन यांनी याविषयी माहिती दिली आहे.
डॉ. के सिवन यांनी भारत अंतराळात स्पेस स्टेशन बनवणार असल्याचे सांगितले होते. आता यासाठी इस्रो पुढील वर्षी “स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ अर्थात “स्पाडेक्स’ करणार आहे. या प्रगोसाठी इस्रो दोन उपग्रहांना एका “पीएसएलवी रॉकेट’च्या मदतीने अंतराळात पाठवेल. हे दोन उपग्रह अशा प्रकारे तयार करण्यात येतील की, जेणेकरून रॉकेट बाहेर आल्यानंतरही अंतराळात हे उपग्रह एकमेकांना जोडलेले राहतील.
उपग्रह जोडण्याची ही प्रक्रिया तशीच आहे, जशी इमारत बनवताना एका विटेला दुसरी विट जोडली जाते. छोट्या छोट्या वस्तू जोडून मोठा आकार तयार होतो. स्पेस स्टेशन बनवण्यासाठी देखील ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रयोगाच्या यशस्वी परिक्षणानंतरच समजेल की, आपण स्पेस स्टेशनमध्ये गरजेच्या वस्तू आणि अंतराळ प्रवाशांना सुरक्षित रित्या पोहचवू शकेल की नाही.
सध्याचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) पाच देशांनी मिळून बनवलेले आहे. या देशांमध्ये अमेरिका (नासा), रशिया (रॉस्कॉमॉस), जपान (जॅक्सा), युरोप (युरोपियन स्पेस एजन्सी) आणि कॅनेडा (कॅनिडीयन स्पेस एजन्सी) यांचा समावेश आहे. या सर्वांना हे अंतराळ स्थानक बनवण्यासाठी 13 वर्ष लागली होते. यासाठी देखील डॉकिंगचा वापर करण्यात आला होता. आयएसएससाठी एकूण 40 वेळा डॉकिंग करण्यात आली होती.
या प्रयोगाची सर्वात कठिण गोष्ट म्हणजे, अंतराळात दोन सेटेलाइट्सची गती कमी करून त्यांना एकमेकांपासून जोडून ठेवणे. जर गती कमी झाली नाही तर, ते एकमेकांना धडकू शकतात. या प्रयोगासाठी इस्रोला सरकारने सध्या 10 कोटी रूपये दिले आहेत. स्पेस स्टेशनसाठी स्पेडेक्स हे एक प्रायोगिक मिशन असेल, असेही सांगण्यात येत आहे.