नवी दिल्ली – ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 लोक जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी शोक व्यक्त केला.
दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जातात आहे. पण रेल्वेच्या दुर्घटनेनंतर काय कारवाई होते, ‘लोको’ पायलट जर दोषी असेल तर त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येत याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
लोको पायलटकडून फार कमी चुका होतात. कारण लोको पायलट सिग्नलच्या आधारे रेल्वेगाडी चालवतो. जर त्याला ग्रीन सिग्नल मिळाला तर तो ट्रेन चालवितो. पण त्याला लाल सिग्नल मिळाला तर तो ट्रेन थांबवितो. लोको पायलट सिग्नल कधीच सोडत नाही. परंतु, ट्रेन रुळावरुन उतरली तर लोको पायलटला दोषी ठरविण्यात येतो.
काय होते कारवाई वाचा…
रेल्वे अधिकारी सर्वोत अगोदर लोको पायलटला तात्काळ प्रभावाने निलंबीत करतात. आणि त्यानंतर लोको पायलटची चौकशी करण्यात येते. ही चौकशी कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टी, सीआएससमोर करण्यात येते.
यावेळी लोको पायलटला अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडतो. लोको पायलटची चूक आढळल्यास त्याला तात्काळ नोकरीवरुन काढण्यात येते. त्यानंतर त्याला पुन्हा सेवेचे संधी देण्यात येत नाही. अश्या प्रकारे लोको पायलटवर कारवाई करण्यात येते.
दरम्यान, ओडिशातील बहानगा गावाजवळ हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. त्यानंतर अचानक या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी मालगाडी धडकली. यातच 280 जणांचा मृत्यू झाला आणि 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.