लंडन – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अशेस कसोटी मालिकेत 4-0 असा पराभव झाल्यावर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा विचार बदलला आहे.
या मालिकेपूर्वी रूटने आपण लिलावासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. मात्र, कसोटी मालिकेत दारूण पराभव झाल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंच्या टी-20 क्रिकेटच्या अति डोसावर प्रचंड टीका होउ लागली व त्यामुळेच रूटने आपला विचार बदलला आहे.
यापूर्वी रूटने 2018 साली आयपीएल लिलावात भाग घेतला होता. पण त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते.