India vs England Test Series : भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची श्रेणी, आक्रमक मानसिकता आणि विकेट्सचा अथक पाठलाग कोणाही नव्या खेळाडूला नक्कीच प्रभावित करेल. अशा शब्दात इंग्लंडचा वरिष्ठ फलंदाज जो रूटने अश्विनचे कौतूक केलं आहे.
पुढे तो म्हणाला, आश्विन हा स्वत:च्या कौशल्याच्या बळावर विकेट घेणारा गोलंदाज आहे. फलंदाजाने चूक करण्याची वाट बघण्यापेक्षा तो फलंदाजाला चूक करायला भाग पाडणारा निराळाच गोलंदाज आहे. आपला 100 वा कसोटी सामना खेळताना आश्विनला गोलंदाजीइतकीच फलंदाजीचीही उत्तम जाण आहे.
रूट पुढे म्हणता की, अश्विनच्या गोलंदाजीत असीम वैविध्य असल्यामुळे फलंदाजांला त्याच्या फिरकीचा अंदाज येत नाही. तो पारंपारिक ऑफ-स्पिनर्सपेक्षा वेगळ्या पद्धतीने क्रिझचा वापर करतो. तो ओव्हर-स्पिन, साइड-स्पिन वापरतो. स्टंपला घासून जाणारे त्याचे अनेक चेंडू फलंदाजाला संभ्रमात टाकतात. शिवाय त्याचा कॅरम बॉल कोण विसरेल?
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाला मालिका प्रभावीपणे जिंकण्याची संधी असेल. या मालिकेत भारतीय संघाने यापूर्वीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.