मँचेस्टर – भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यामध्ये सध्या पावसाने व्यत्यय आणला असून पावसामुळे सध्या भारताचा डाव ४६.४ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात ३०५ धावांवर खोळंबला आहे. भारतर्फे आतापर्यंत के एल राहुलने ५७, रोहित शर्माने १४० तर विराट कोहलीने ७१ धावांची नाबाद खेळी केली आहे. भारताच्या निर्धारित ५० षटकांच्या डावातील २० चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे.