नवी दिल्ली -केंद्र सरकारने इएसआयमधील कंपन्या आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानात कपात केली आहे. यावर आयटक कामगार संघटनेने टीका करताना म्हटले की योगदानातील कपातीऐवजी या योजनेअंतर्गत सवलती वाढविणे आणि अंमलबजावणी देखरेखीवर लक्ष ठेवण्याची गरज होती.
आम्ही निर्णयाला यासंबंधातील बैठकीत जोरदार विरोध करूनही सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्याचे आयटकने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.