नवी दिल्ली: भारतात येणारी आणि भारतातून जाणारी सर्व प्रकारची व्यावसायिक प्रवासी विमाने 31 ऑगस्ट अखेर बंद ठेवण्याचा निर्णय नागरी उड्डाण महासंचालकांनी शुक्रवारी जाहीर केला.
देशांत 25 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर वंदे भारत मोहीमेअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी काही विमनांना परवानगी देण्यात आली होती.
केंद्र सरकारने 29 जुलैला जाहीर केलेल्या अनलॉक 3 च्या मार्गदर्शक सूचनांतही आंतर राष्ट्रीय विमान सेवेवर बंदी घालत असल्याचे जाहीर केले होते.