आलिया भटला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या आता 5 कोटींच्या वर पोहोचली आहे. या निमित्ताने आलियाने आपल्या फॉलोअर्ससाठी एक स्पेशल पोस्ट लिहिली आहे. तिने आपल्या फॉलोअर्सना धन्यवाद देताना एक इमोशनल पोस्टही लिहिली आहे. “थॅंक्यू माझा परिवार, आज माझ्या कुटुंबातील 50 दशलक्ष जणांचे प्रेम मला मिळते आहे.
माझा स्नेह देखील तुम्हा सर्वांबरोबर कायम असेल.’ असे आलियाने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिकलेली एक महत्त्वाची गोष्ट आपल्या फॅन्सबरोबर आलियाने शेअर केली आहे. सोशल मीडिया एन्टरटेनमेंट करतो. आपण सगळे जण या सोशल मीडियाशी कनेक्ट आहोत.
पण हा सोशल मीडिया म्हणजे आपण नाही. जेंव्हा सोशल मीडियावर 5, 15 अथवा 25 फॉलोअर्स होते, तेंव्हाही मी खुश होते. तेंव्हाही मी माझ्या फॉलोअरची विशेष आभारी होते. आपल्या आयुष्यात जे लोक आपल्याशी जोडलेले असतात, त्यांच्याचमुळे आपल्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो.
सोशल मीडियावरच्या कनेक्टिव्हीटीमुळे आपल्या आयुष्याला एक आभासी अर्थ प्राप्त होतो, असा मौलिक विचार आलियाने मांडला आहे. सोशल मीडियावर इतरांची स्तुती किंवा निंदा करण्यापेक्षा स्वतःचे कौतुक करावे, असेही तिने सुचवले आहे.