तुतीकोरीन – भारतीय नौदलाद्वारे ऑपरेशन समुद्र सेतूसाठी तैनात आयएनएस ऐरावत 198 भारतीय नागरिकांना माले, मालदिववरून घेऊन आज 23 जून रोजी पहाटे तुतीकोरीन येथे पोहोचले. आतापर्यंत भारतीय नौदलाने मालदिवमधील 2386 भारतीय नागरिकांना भारतात परत आणले आहे.
मालदिवमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतीय नागरिकांना आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर जहाजात बसविण्यात आले.
सागरी प्रवासादरम्यान कोविड सुरक्षा शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मायदेशी आलेल्या नागरिकांना तुतीकोरीन मधील स्थानिक अधिकाऱ्यांनी जहाजातून खाली उतरवले. आरोग्य तपासणी आणि प्रवाशांचे इमिग्रेशन आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती. यासह, भारतीय नौदलाने सध्याच्या साथीच्या काळात मालदिव, श्रीलंका आणि इराण येथून भारतात आणलेल्या भारतीय नागरिकांची संख्या 3305 वर पोहोचली.