विशाखापट्टणम : भारत- वेस्टइंडिज दरम्यान विशाखापट्टणम येथील डाॅ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून भारतास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले असून भारताने दमदार सुरूवात केली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करत भारतीय संघाची धावसंख्या दोनशेपार नेली आहे.
रोहित शर्माने १०७ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याचे हे कारकिर्दीतील २८ वे शतक ठरले.
💯
Hitman gets to this 28th ODI Century. His 7th ODI ton of 2019. Top Man 🙌🙌#INDvWI pic.twitter.com/vxJkExGywF
— BCCI (@BCCI) December 18, 2019
तर लोकेश राहुलने १०२ चेंडूत १०१ धावा करत शतक पूर्ण केलं. राहुलचे कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले.
Here it is 💯
A fantastic innings as @klrahul11 brings up his 3rd ODI ton 👏👏#INDvWI pic.twitter.com/z4TiKocgeC
— BCCI (@BCCI) December 18, 2019
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ३६.२ षटकात बिनबाद २२१ धावा झाल्या आहेत.