मुंबई – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या (दि.17) शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या एकदिवसीय तिन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातून भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माने माघार घेतली होती. त्याचे कारण आता समोर आले असून रोहितच्या भावाचा विवाह असल्यानेच त्याने पहिला सामना खेळता येणार नसल्याचे बीसीसीआयला कळवले होते व त्यासाठी बीसीसीआयने मान्यताही दिली होती.
रोहितच्या अनुपस्थितीत अष्टपैलु हार्दिक पंड्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या तिन सामन्यांच्या मालिकेतील उर्वरीत दोन एकदिवसीय सामने रोहित खेळणार आहे.
सध्या तरी पहिल्या सामन्यासाठी रोहितच्या जागी नव्या कोणत्याही पर्यायी खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. तसेच पाठीच्या दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतलेल्या श्रेयस अय्यरच्या जागाही पर्यायी खेळाडू जाहिर केलेला नाही.
WTC 2023 final : आकाश चोप्रा यांचा ICC ला सवाल, म्हणाले “अंतिम सामना इंग्लंडमध्येच का…”
दरम्यान, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून तिन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. यातिल पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर होत असून यंदा भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी ही मालिका दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाची असल्याने याकडे रंगित तालिम म्हणूनच पाहीले जात आहे.