नवी दिल्ली – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या जून महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारताचे माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा यांनी आयसीसीवर ताशेरे ओढले आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना नेहमी इंग्लंडमध्येच का खेळवला जातो, असा सवालही त्यांनी केला आहे.
बॉर्डर-गावसकर करंडक चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले. हा सामना येत्या 7 ते 11 जून या कालावधीत इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी एक दिवस राखिवही ठेवला गेला आहे. मात्र, चोप्रा यांनी आयसीसीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
तटस्थ ठीकाणी सामना घ्यायचा हे मान्य परंतू नेहमी इंगलंडचीच निवड का केली जाते. येथील खेळपट्ट्या आशियाई वातावरणासारख्या नसतात. तसेच स्पोर्टीही नसतात. तसेच जूनमध्ये इंग्लंडमधील वातावरण लहरी असते अनेकदा पावसाचा व्यत्ययही येतो. गेल्या वेळीही असेच घडले होते. यातूनही आयसीसीने काही बोध घेतला नाही, अशी टीकाही चोप्रा यांनी केली आहे.
WTC 2023 final : गावसकरांना पुन्हा राहुलचा कळवळा, म्हणाले “विजेतेपद मिळवायचे असेल तर भरतला…”
तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरवायचा असेल तर केवळ एकच सामना का खेळवला जातो. किमान तीन सामने खेळवले गेले पाहिजेत. एक घरच्या मैदानावर, दुसरा अन्य देशाच्या मैदानावर तर तिसरा सामना तटस्थ ठीकाणी खेळवला गेला पाहिजे. म्हणजेच दोन्ही संघांना समान संधी मिळेल व त्यात दोन सामने जिंकणारा संघ खरा जागतिक दर्जाचा ठरेल, असेही ते म्हणाले.