नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात जारी केलेल्या नवीन नकाशामध्ये आपल्या सार्वभौम प्रदेश अचूकपणे दर्शवण्यात आला आहे. नेपाळबरोबरच्या सीमांची कोणत्याही प्रकारे फेरआखणी करण्याता आलेली नाही, असे भारताने गुरुवारी म्हटले आहे. देशाच्या सुदूर-पश्चिमेस स्थित कलापानी क्षेत्र नेपाळच्या हद्दीत आहे, असे नेपाळने बुधवारी म्हटले होते.
कलापानी भाग भारताच्या हद्दीत दाखवले गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याकडे नेपाळ सरकारने लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभुमीवर भारताच्यावतीने हे स्पष्टिकरण देण्यात आले. जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झल्यानंतर या प्रदेशाचा बदललेला नकाशा भारताच्यावतीने शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला होता.
“नव्या नकाशामध्ये नेपाळबरोबरच्या सीमा काहीही बदलल्या नाहीत. सध्या अस्तित्त्वात असलेल्या यंत्रणेनुसारच नेपाळबरोबरच्या सीमा रेखाटण्याचे काम चालू आहे. आमच्या मित्र देशाने चर्चेद्वारे तोडगा काढण्यास आम्ही बांधील आहोत, हे पुन्हा स्पष्ट करत आहोत.’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.
दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण करण्याच्या प्रयत्नांपासून दोन्ही देशांनी दूर राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.