नवी दिल्ली : सध्या राज्यासह देशभरात व्हायरल इन्फेन्क्शन चे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यात सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षण दिसून येत आहेत. त्यातच जर तुम्ही खोकल्यासाठी कफ सिरप वापरात असाल तर काळजी घ्या. कारण जागतिक आरोग्य संघटनेने एका भारतीय कफ सिरपबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
भारतातील ‘कोल्ड आऊट’ हे कफ सिरप धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असून हे कफ सिरप कमी दर्जाचे असल्याचे म्हटले आहे. या भारतीय कफ सिरपवर इराकमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याआधीही भारतात बनवलेल्या अनेक कफ सिरपवर इतर देशात बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, पॅरासिटामॉल आणि क्लोरफेनिरामाइनच्या मिश्रणातून बनवलेले कफ सिरप हे सामान्य सर्दी, खोकला आणि ऍलर्जीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. पण कोल्ड आऊट हे कफ सिरप सुरक्षितता आणि गुणवत्तेबाबत जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मानकांपासून वेगळे आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, इराकमध्ये नुकतेच बंदी घालण्यात येणारे खोकल्याचे औषध कोल्ड आऊट फोर्ट्स इंडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडसाठी Dabilife Pharma Pvt Ltd ने तयार केले आहे.
डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे की, या कफ सिरपमध्ये एथिविन ग्लायकोल आणि डायथिलीन ग्लायकोल या दोन्ही घटकांची मात्रा ठराविक मर्यादेपेक्षा 0.10 टक्के अधिक आहे. हे कोणासाठीही धोकादायक ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, या औषधाचा वापर लोकांचे आरोग्य गंभीरपणे बिघडवू शकत नाही तर मृत्यू देखील होऊ शकतो.