नवी दिल्ली – करोना महामारीच्या कालावधीमध्ये भारतातील सर्वसामान्य नागरिकांची आरोग्यविषयक आणि औषधविषयक जागरूकता वाढली असली तरी याची दुसरी बाजू ही आता लक्षात आली आहे भारतातील बहुतांश नागरिक कोणताही विचार न करता औषधांचा वापर करत आहेत एका वर्षभरात तब्बल 500 कोटी रुपयांची अँटिबायोटिक औषधे भारतीयांनी खरेदी केली आहेत लासेन्ट या आघाडीच्या आरोग्यविषयक नियतकालिकाने आपल्य रिजनल साऊथ इस्ट एशिया या नियतकालिकात एका अहवालात माहिती देण्यात आली आहे.
ज्या काळात भारतात महामारी अत्युच्च स्थानावर होती त्या 2019 मध्ये भारतीयांनी एका वर्षात तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या अँटिबायोटिक गोळ्या वापरल्या यापैकी अनेक गोळ्यांना अन्न व औषध प्रशासनाची मान्यताही नसल्याचे समोर आले आहे हे संशोधन करताना लँसेंट ने भारतातील प्रायव्हेट विक्रेते आणि दुकानदार यांची माहिती संकलित केली.
देशातील एकूण 9000 औषध दुकानांनी केलेल्या विक्रीच्या माहितीचा आढावा घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे प्रकाशित केलेल्या अहवालाप्रमाणे भारतीय नागरिक कोणताही विचार न करता अँटिबायोटिक औषधांचा वापर करत आहेत या औषधांचा आपल्या शरीरावर कोणता विपरीत परिणाम होईल याबाबत कोणतीही माहिती त्यांना नाही किंवा ही माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
एखाद्या जिवाणूचा मुकाबला करण्यासाठी किंवा त्या जीवाणूंमुळे झालेल्या आजारावर मात करण्यासाठी अँटिबायोटिक औषधे वापरली जातात खरेतर रुग्णाचा प्राण संकटात असेल तरच अँटिबायोटिक औषधांचा मारा करून त्याला बरे करण्याचा विचार केला जाऊ शकतो पण हजारो भारतीय नागरिक जलद बरे होण्याच्या उद्देशाने कोणताही विचार न करता त्यांची अशाऔषधांचा वापर करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे