Operation Ajay – इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये अभूतपूर्व मानवतावादी संकटादरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा संघर्ष सुरूच आहे. लोक जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत आहेत. इस्रायलमध्ये भारतातील हजारो नागरिकही राहतात. त्यांच्या घरी परतण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ राबवले आहे. इस्रायलमधील सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे.
External Affairs Minister Dr S Jaishankar tweets, “Operation Ajay moves forward. 286 more passengers are coming back to India. Also carrying 18 Nepalese citizens.” pic.twitter.com/iaUnI1yyGg
— ANI (@ANI) October 17, 2023
286 नागरिकांची वापसी –
इस्रायलच्या युद्धग्रस्त आणि संवेदनशील भागात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी, परराष्ट्र मंत्रालयाच्या देखरेखीखाली ऑपरेशन अजय अंतर्गत प्रवाशांना विमानाने भारतात आणले जात आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, ऑपरेशन अजय अंतर्गत 286 नागरिकांना भारतात आणले जात आहे.
ऑपरेशन अजय अंतर्गत 286 प्रवाशांना एअरलिफ्ट केले जाईल –
परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, ऑपरेशन अजय सतत सुरू आहे. 286 प्रवाशांना भारतात आणले जात आहे. विमानात 18 नेपाळी नागरिकही असतील. गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेच्या विरोधात केलेल्या लष्करी कारवाईतही मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत.
युद्धादरम्यान 2 दशलक्ष पॅलेस्टाईन निर्वासितांवर संकट –
गाझा पट्टीवर इस्रायली सैन्याच्या मोठ्या कारवाईदरम्यान, पॅलेस्टिनी निर्वासित संकटात सापडल्याचा दावा करत आहेत. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाझा पट्टीमध्ये सुमारे 2 दशलक्ष लोक मानवतावादी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, इस्रायलने केलेल्या कारवाईमुळे रुग्णालयातील वीज, पाणी या मूलभूत गोष्टींवरही संकट आले आहे.
दरम्यान, याआधी ऑपरेशन अजय अंतर्गत तेल अवीवहून चार चार्टर्ड फ्लाइटमध्ये एकूण 906 प्रवासी आले होते. त्यामध्ये मुलांचाही समावेश आहे. त्यानंतर आता आणखी एक विमान 286 नागरिकांना घेऊन भारतात परतणार आहे. हे विमान तेल अविववरून उड्डाण घेतले आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) च्या म्हणण्यानुसार इस्रायलमधील मृतांची संख्या 1400 हून अधिक झाली आहे. शिवाय, हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामध्ये सुमारे 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे. तर गाझामध्ये किमान 2,778 लोक मारले गेले आणि 9,700 जखमी झाले, असे तेथील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.